सत्तेच्या खुर्चीसाठी ग्रामीण राजकारणाचा चाललेला संघर्ष ! आत्ता खूर्ची आपलीच !

खुर्ची हा मराठी चित्रपट, गेले काही दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट १२ जानेवारी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट निवडणुकीनंतरच्या राजकीय गोंधळाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अविश्वासाची सस्पष्ट आणि वास्तववादी झलक दाखवतो.(khurchi new marathi movie)

कथानक : खुर्ची चित्रपट एका ग्रामीण भागातील निवडणुकीच्या कथेवर आधारित आहे. या निवडणुकीत खुर्चीसाठी अनेक उमेदवार उभे राहतात.. दोन प्रमुख उमेदवार राकेश बापट आणि अक्षय वाघमारे यांच्यात निवडणूक  चांगलीच रंगते. गावकऱ्यांची मते मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून आश्वासने, खोटे प्रलोभन दाखवले जातात. शेवटी राकेश बापट  जिंकतो पण विजयानंतर राजकीय खेळांचे नवे डाव सुरू होतात.  राकेश बापट हा एक सरळ-सोपा गावकरी आहे. तो गावासाठी काहीतरी चांगले करू इच्छितो. दुसरा उमेदवार आहे, अक्षय वाघमारे हा एक हुशार आणि महत्वाकांक्षी माणूस आहे. तो खुर्ची मिळवून गावावर वर्चस्व गाजवू इच्छितो. पार्टीतील गटबंदी, विश्वासघात, आणि स्वार्थापोटी यामुळे अविश्वासाचे वातावरण तयार होते. कथानक पुढे कसे रंगते हे चित्रपटात गुंफले आहे.(khurchi new marathi movie).

Khurchi Marathi Movie Review
Khurchi Marathi Movie Review

 (khurchi new marathi movie) या चित्रपटाचे दिग्दर्शन  संतोष कुसुम हगवणे आणि  शिव धर्मराज माने यांनी केले आहे. या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, प्रीतम काणे, श्रेया पसलकर, महेश घाग, कल्याणी नंदकिशोर – चौधरी, सुरेश विश्वकर्मा, मेघराज राजे भोसले आणि आर्या धनश्री शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन चांगले केले आहे. त्यांनी चित्रपटाचे कथानक चांगल्या प्रकारे मांडले आहे. चित्रपटाची पटकथा देखील उत्तम आहे.

 हे ही वाचा :  ‘ नवरदेव Bsc.Agri ‘ चित्रपटचा ट्रेलर झाला प्रदर्शित ,प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद…

संगीतकार संमित वाघमारे आणि अभिषेक काते यांनी चित्रपटातील गाणी खूपच चांगली रचली आहेत. (khurchi new marathi movie) चित्रपटातील गाणी चित्रपटाच्या कथेला साथ देतात.खुर्ची हा एक चांगला चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक मनोरंजक आहे. कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे. दिग्दर्शन चांगले आहे.चित्रपटातील संगीत उत्तम आहे. गाणी परिस्थितीशी जुळणारी आहेत आणि कथानकाला पुढे नेण्यास मदत करतात. पार्श्वसंगीताने देखील तणाव आणि भावनांची उत्तम निर्मिती केली आहे. पण काही वेळेस काही सीन लांबवलेले वाटतात. राजकीय खेळांची प्रकटण अतिशयोक्त वाटते. कथेचा शेवट प्रेक्षकांना गोंधळावून टाकतो. चित्रपटात अविश्वास आणि राजकीय गुन्हेगारीवर प्रखर भाष्य केले आहे.  जर तुम्हाला मराठी चित्रपट आवडत असतील , तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहावा.

  हे ही तुम्हांला वाचायला आवडेल 

1 thought on “सत्तेच्या खुर्चीसाठी ग्रामीण राजकारणाचा चाललेला संघर्ष ! आत्ता खूर्ची आपलीच !”

Leave a Comment