स्टारप्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते !’ लवकरच आपला निरोप घेणार आहे ,अशी चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये रंगली आहे. सोशल मीडियावर आहे याबाबत अनेक पोस्ट, रील वायरल होत आहेत. आता याबाबत स्टार प्रवाह या वाहिनीने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.‘आई कुठे काय करते !’ ही मालिका सुरू आहे. पुढेही काही काळ सुरूच राहणार या मालिकेमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे.(major change in aai kuthe kay karte serial)
‘आई कुठे काय करते !’ ही मालिका चार वर्षांपूर्वी सुरू झाली . या मालिकेच्या वेगळेपणामुळे मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले . टीआरपी मध्ये ही मालिका नेहमीच अव्वल स्थानी राहिली आहे . काही दिवसांपासून या मालिकेच्या कथानकमध्ये झालेला बदल पाहून प्रेक्षकानी मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे या मालिकेचा टीआरपी घसरताना दिसत आहे. त्यातच आता स्टार प्रवाह वर नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली. (major change in aai kuthe kay karte serial)
आणखी वाचा :असं हवं घर ,जुई गडकरीने पोस्ट शेअर करत म्हणाली…
!['आई कुठे काय करते !' या मालिकेबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. 2 Marathi Filmy Adda - Marathi Movie | TV Entertainment | Film reviews | News major change in aai kuthe kay karte serial](https://marathifilmyadda.com/wp-content/uploads/2024/02/major-change-in-aai-kuthe-kay-karte-serial-1-1024x512.jpg)
‘ साधी माणसं ’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली ’या दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली. यामुळे ‘आई कुठे काय करते !’ ही मालिका बंद होणार अशी चर्चा सुरू झाली, पण ही केवळ अफवा आहे. या मालिकेच्या वेळेमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. (major change in aai kuthe kay karte serial)ही मालिका 18 मार्चपासून दुपारी २:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे . या मालिकेच्या जागी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सुरू होणार आहे.आई कुठे काय करते ह्या मालिकेमध्ये प्रमुख अरुंधती केळकरच्या भूमिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर , अनिरुद्ध देशमुखच्या भूमिकेत अभिनेता मिलिंद गवळी , संजना देशमुखच्या भूमिकेत अभिनेत्री रुपाली भोसले दिसत आहेत. ह्यात अजून काही प्रमुख पात्र ही आहेत.
‘आई कुठे काय करते ! ’ या मालिकेबाबत नाराजी व्यक्त होत असली तरी घरोघरी मातीच्या चुली ह्या नव्या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे.(major change in aai kuthe kay karte serial)घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेमध्ये प्रमुख कलाकार दिसणार आहेत. त्याचं बरोबर शिवानी बावकर आणि आकाश नलावडे ह्यांची ‘ साधी माणसं’ या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये आतुरता लागली आहे.
1 thought on “‘आई कुठे काय करते !’ या मालिकेबाबत मोठा बदल करण्यात आला आहे.”